ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, कळमेश्वर हा जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत कार्यरत असून कळमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि सातत्यपूर्ण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जल जीवन मिशन (JJM) या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत, प्रत्येक ग्रामीण घराला Functional Household Tap Connection (FHTC) म्हणजेच नळजोडणीद्वारे दररोज शुद्ध पाणी पुरविण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
शासनाचा उद्देश आहे की, प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज किमान ५५ लिटर पाणी वैयक्तिक नळजोडणीद्वारे उपलब्ध करून दिले जावे.
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामार्फत कळमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये खालील कार्ये केली जातात:
- नवीन पाणीपुरवठा योजना तयार करणे
- जुन्या योजनांची दुरुस्ती करणे
- आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी
- विंधन विहिरी, कूपनलिका, विहिरी
- जलकुंभ (ESR)
- पाइपलाइन यंत्रणा
- पंपिंग व मोटारिंग सुविधा
- पाण्याचे स्रोत बळकटीकरण (Source Strengthening)
- जल जीवन मिशन (JJM)
- १५ वा वित्त आयोग (15th Finance Commission)
- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी निधी (PHE)
- प्रधानमंत्री खानिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKY)
- खासदार / आमदार स्थानिक विकास निधी
- सामान्य निधी
कळमेश्वर तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण घराच्या दारापर्यंत वर्षभर दररोज ५५ लिटर प्रति व्यक्ती दराने (LPCD) शुद्ध व सुरक्षित पाणी नळजोडणीद्वारे उपलब्ध करून देणे, हा या उपविभागाचा स्पष्ट दृष्टीकोन आहे.
- पूर्वी ४० LPCD सेवा स्तरावर योजना तयार केल्या जात होत्या.
- जल जीवन मिशन अंतर्गत हा सेवा स्तर वाढवून ५५ LPCD करण्यात आला आहे.
- प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे नियमित आणि गुणवत्तायुक्त पाणीपुरवठा करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
सुरक्षित पाणी – आरोग्यदायी जीवन
ग्रामीण जलसंपदेसाठी एक समर्पित प्रयत्न